आज आपल्याला भारतिय गणितज्ञ म्हणले कि काहि विषेश प्रसिध्द असणारे नावेच आठवतात उदा. भास्कराचार्य, ब्रम्हगुप्त ई.. पण काय भारतात फक्त तेवढेच गणितज्ञ होऊन गेले आहेत का? नक्कीच नाही. जितके प्रसिध्द गणिती आहेत आपल्याला फक्त तेवढ्यांचिंच नावे माहित आहेत. पण गणित इतिहासातल्या बहुतेक गणितींची नावे तर काळाच्या पडद्याआड गेले आहेत त्यातुनहि ज्या कमी - अधिक प्रसिध्द गणितींचा उल्लेख या प्रसिध्द गणितींच्या ग्रंथांमध्ये आढळतो त्यांच्या बद्दल आपल्याला खुप कमी माहिती आहे. अशा गणितींचा सुध्दा कुठेतरी उल्लेख व्हायला हवा आपल्याला त्यांच्याबद्दल सुध्दा माहिती असायला हवी म्हणूनच आजची हि पोस्ट.. लाटदेव :- यांनी प्राचीन रोमक सिध्दांतांवरच चर्चा करणारे ग्रंथ लिहिले. यांना प्राचीन भारतीय गणिताचा ग्रीक गणित वगैरेंशी असलेला संबंध जगापुढे आणायचा होता असे मानले जाते. नि:शंक :- यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकि कुठलाही ग्रंथ आज उपलब्ध नाही. हे स्वतः जुने लिखाण पडताळून (तपासून) पाहत असल्यामुळे यांच्या मतांना त्यांच्या नंतरच्या गणितींनी खुप किंमत दिली यांचे यांच्या नंतरच्या गणितज्ञांच्या ग्रंथात अनेकवेळा आलेले आहे. याने
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दाचीच शस्त्रे यत्न करू।। शब्दची आमुच्या जीवाचे जीवन। शब्दे वाटू धन जनलोका।। तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव।