मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

#self_help_marathi लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ध्यानाचे प्रकार - आनापान

मला ध्यानधारणा करण्यासाठी सगळ्यात सोपी आणि आनंददायी वाटणारी पध्दत... आनापान ही ध्यान सुमारे २६०० वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी शिकवली.... ध्यान नेमक कशावर किंवा कशाच करायचे?  ध्यानाला सुरवात करण्या अगोदर आपल्याला आलंबन निवडावे लागेल. आता आलंबन म्हणजे काय? तर आपल्याला एखादी अशी गोष्ट ज्यावर आपल्याला मन केंद्रित करायचे आहे. उदा. तुम्ही मंत्र ध्यान करत असाल तर तुम्ही जो काही मंत्र निवडला आहे तो मंत्र म्हणजे तुमचे आलंबन. आपण आनापान संदर्भात बोलायचे तर आपला येणारा जाणारा श्वास आपले आलंबन निवडणार आहोत.  मंत्र ध्यान कसे करायचे? आनापान ध्यान म्हणजे काय? आन = येणारा श्वास अपान = जाणारा श्वास थोडक्यात येणार्‍या जाणार्‍या श्वासावर लक्ष देणे म्हणजे आनापान ध्यान. आनापान ध्यान कसे करायचे? १) आरामदायक स्थितीमध्ये पण कंबर, पाठ आणि मान सरळ राहील असे बसने. (हव तर मांडी घालून किंवा खुर्चीवर दोन्हीपैकी जे सुखकर होईल असे बसने) २) अलगदपणे डोळे बंद करने ३) येणाऱ्या - जाणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रीत करने. कोणतेही ध्यान करताना एक गोष्ट सारखी होत राहते आणि ती म्हणजे लक्ष भटकणे उदा. तुम्ही ...

ध्यान म्हणजे काय?

भरपुर वेळ झाला तो माणूस तिथेच त्या टेकडीवर थांबलाय... काय करत असेल तो माणूस? मोकळ्या हवेला बसलेल्या तिन मित्रांपैकी एकाने समोरच्या टेकडीकडे बोट दाखवून विचारले.. तो नक्कीच त्याच्या एखाद्या जनावरांच्या शोधात असेल कारण त्या टेकडीवरून आजुबाजुचे भरपुर दूरपर्यंत दिसते... दुसर्‍याने उत्तर दिले.. पण तो किती वेळेपासून एकाच दिशेला तोंड करून उभा आहे.. त्यामुळे मला नाही वाटत तो तिथे जनावराचा शोध घेण्यासाठी गेला असेल कदाचित तो त्याच्या मागुन येणाऱ्या साथीदाराची वाट बघत असेल... तिसरा म्हणाला..  नाहि रे मला वाटते तो नक्कीच तिथे ध्यानधारणा करत असेल.. पहिला म्हणाला.  तिघांचेही एकमत काही होत नाही अस पाहून आपण त्यालाच जाऊन विचरूयात तसही आपण  खुप वेळचे बसलो आहोत त्या निमित्ताने आपली एक मस्त चक्कर होईल या विचाराने तिघे त्या टेकडीवर गेले, त्या तिघांनी टेकडीवर जाऊन तिथे थांबलेल्या माणसाला सगळे सविस्तर सांगितले आणि विचिरले की आम्ही तिघे कितीतरी वेळेपासून तुमचे निरीक्षण करत आहोत आम्हाला या गोष्टीची उत्सुकता लागली आहे की तुम्ही ईतक्या वेळेपासून या टेकडीवर थांबुन नक्की काय करत आहात? मी तर फक्त थांब...

ध्यानाचे प्रकार - मंत्र ध्यान

ध्यान करण्यासाठी जी मनाची पुर्वतयारी करावी लागेल त्या बद्दल आपण आपल्या मागिल मागात पाहिले. आज आपण ध्यान करण्याच्या अनेक पध्दतिपैकी एक पध्दत म्हणजेच मंत्र ध्यान (Mantra Meditation) काय आहे व ते कसे करायचे याबद्दल माहिती करून घेणार घेणार आहोत... तर चला मग करूया सुरवात.. मंत्र म्हणजे काय?   मनाची तुलना अनेक ऋषि मुनिंनी माकडासोबत केली आहे जे कधिही शांत बसत नाही त्याच मनाला शांत करण्यासाठी ध्यान केले जाते, अर्थात त्याचे अनेक आध्यात्मिक पैलू देखील आहेत, पण त्यावर अत्ता चर्चा नको..  मंत्र हा शब्द मं=मन + त्र = रक्षण करणारा असा आहे म्हणजेच असे म्हटले तर हरकत नाही की मनाचे रक्षण करण्यासाठी वापरलेला शब्द, वाक्य कींवा ध्वनी म्हणजे मंत्र. मंत्राची निवड  आता मंत्र ध्यान करायला एखादा मंत्र तर हवा. तर तो कसा निवडणार? तर आपण कोणता मंत्र वापरावा? भारतिय परंपरेत अनेक पवित्र मंत्र आहेत उदाहरण द्यायचे झाले तर गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र आणि आणखी खुप सारे पण आपल्याला मोठ्या मंत्राच्या ऐवजी लहान म्हणजे बीजमंत्राचा वापर करणे जास्त सोयीचे होईल, जसे की ॐ नमः शिवाय, ॐ नमो दत्ताय कीं...

ध्यान आणि ध्यानाची पूर्वतयारी

तुम्ही जर ध्यान कसे करावे या प्रश्नाचे उत्तर शोधत आहात तर तुम्ही योग्य जागी आहात. आपण आजच्या पोस्ट मध्ये ध्यान किंवा meditation याच विषयावर चर्चा करणार आहेत. ध्यान धारणेची परंपरा प्राचीन काळापासून भारतात आहे, आपल्याला अनेक ध्यानी ऋषी मुनींचे वर्णन आपल्या रामायण, महाभारत व ईतर साहित्यात मिळते. योग आणि ध्यान वेगवेगळे आहेत का? पतंजली योग सुत्रांमध्ये अष्टांग योगाचे वर्णन आपल्याला मिळते. अष्टांग म्हणजे आठ अंग किंवा आठ भाग ते पुढिल प्रमाणे :- यम, नियम, प्रत्याहार, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी. याचाच अर्थ असा की योग ह्या प्रक्रिया मधल्या ध्यान हा एक भाग आहे.  आज आपण प्रामुख्याने धारणा आणि ध्यान यावर चर्चा करणार आहे. धारणा म्हणजे काय?  जसे मी माझ्या मागील ध्यानाचे फायदे या ब्लाॅगमध्ये बोललो होतो एखादी गोष्टं किंवा घटना आपण आपल्या मनात किती वेळ धरून ठेऊ शकतो ही क्षमता म्हणजे आपली धारणाशक्ती. पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर एक उदाहरण घेऊन आपल्याला धारणा, ध्यान आणि समाधी समजुन घेता येईल. समजा तुम्ही एखाद्या देवाच्या प्रतिमेचे ध्यान करत आहात तर डोळे मिटून तुम्ही त्या प्रतिमेची स...

ध्यानाचे फायदे

ध्यान का करायला पाहीजे? (why everyone should meditate?) कींवा ध्यानाचे फायदे काय आहेत या बद्द्ल आपण थोडी चर्चा करणार आहोत.  आजकाल आपले जीवन खुपच धावपळीत चालले आहे, आपला दिवस घर - काम - घर आणि उरलेला वेळ मनोरंजनात व परीवार या सगळ्याचा विचार करण्यातच जातो यामुळे होत काय आहे की आपल्या मनावर येणारा ताण खुपच वाढत आहे, आपल्याकडे स्वत:साठी काही वेळ नाहिये. आपला दिवस भराचा वेळ कुठे निघून जातोय हे आपल्यालाच लक्षात येत नाही. आपण स्वतःला देखील वेळ देत नाही. बर ते जाऊ द्या आपण ध्यानधारणा करण्याचे काही फायदे कींवा benefits of meditation यावर चर्चा करूया ध्यान करण्याचे फायदे :- 1) मन शांत होते :- आपला मेंदू हा एखाद्या कथाकारा प्रमाणे असतो, आपले विचार आपला दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी आपण आपल्या नकळतपणे आपल्या सोयीनुसार समजून घेत असतो आणि पहायला गेलं तर त्यात किही चुकीचे नाही पण कित्येकवेळा आपल्या मनाची विनाकारण बडबड चालू असते. आजकाल तर प्रमाणाबाहेर विचार करण्याला ट्रेंड मानल जाते पण एकदा या पद्धतीने विचार करून पहा. अस समजा तुमच मन ही स्वतंत्र व्यक्ती आहे आणि सदैव तुमच्या सोबत असते. ...

अविद्या आणि आपण

एकदा बादशाह अकबराने दरबाराला उद्देशुन प्रश्न केला हि अविद्या काय असते? पण बादशाहाला कोणी समर्पक उत्तर द्यायना, शेवटी बादशाह ने बिरबल ला तोच प्रश्न विचारला, बादशाह म्हणाला बिरबल काय तू सु्ध्दा माझ्या प्रश्नाचे योग्य ते उत्तर नाही देऊ शकणार का? यावर बिरबल म्हणाला बादशाह मी नक्कीच आपल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो पण… पण काय बिरबल? बादशाह म्हणाला. त्यावर बिरबल म्हणाला कि मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो पण मला चार पाच दिवसांची सुट्रटी पाहीजे मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल पण मी सध्या खुपच दमलेलो आहे त्यामुळे मला चार पाच दिवसांची तरी सुट्टी मिळाव‍ि अशी मी विनंती करतो सुट्टीवरुन आल्यावर मी आपल्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देईल. यावर बादशाह बिरबल ला सुट्टी देतात. बिरबल एका चांभाराकडे जाऊन त्याला एक जोडी साधारण मापाची चप्पल शिवायला सांगतो, पण चप्पल कशी? त्या चपलीला हिरे मोती अणखी वेगवेगळ्या प्रकारचे किमती रत्ने त्या चपलिला लावायला सांगतो. दोन दिवसा नंतर त्या चांभारा कडुन चप्पल घेऊन यतो व रात्री त्या जोड्यामधिल एक चप्पल तो गुपचुप पणे एका मशिदी च्या अंगणात ठेऊन येतो. पहाट...

व्यक्त मन - भाग १

  असे म्हणतात कि माणसाच्या मनात एका दिवसात जवळ पास ७० ते ८० हजार विचार येतात, आणि त्यातले बहूतेक विचार हे नकारात्मक किंवा असे असतात जे आपल्या काही कामाचेच नसतात. हिंदी मध्ये एक म्हण आहे “खालि दिमाग शैतान का घर” पण जर एखाद्याच्या डोक्यात बिनाकामाचे किंवा नकारात्मक किंवा नकोसे असणारे विचारच प्रमाणा बाहेर असतिल तर त्याच काय? अशा माणसाचे डोके सुध्दा काही शैतानाच्या घरापेक्षा कमी नाही, बरोबर ना? माणसाच्या अंतरमनाच्या शक्तिला आपण खुपच कमी लेखतो, स्वामि विवेकानंद आणि त्यांच्यासारख्या अनेक महान माणसांनी आपल्याला वेळोवेळी विचांरांचे आणि मानवि मानाच्या शक्तिचे महत्व सांगितलेले आहेच तरी आपण सगळेच त्याकडे दुर्लक्ष करतो. अर्थात विचारांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे काही खायची गोष्ट नाहीये पण आपल्याला आपले विचार नियंत्रित नाही करता येत, आणि आपण शांत एका जागेवर बसुन अस तर नाही म्हणु शकत कि आता मी काहीच विचार करणार नाही. आधि तर तसा प्रयत्न आपल्या सारख्या सामान्य माणसाने करणे एकप्रकारे हास्यास्पदच आहे. असो. ईतक काही सांगायचा मुख्य मुद्दा असा कि आता corona असल्यामुळे वातावरण खुपच नकारात्मक झालेल आहे...