आर्यभट्ट द्वितीय (aryabhatta dvitiy) :-
भारतात दोन आर्यभट्ट नावाचे गणिती होऊन गेले. या दुसर्या आर्यभट्ट ला आपण आर्यभट्ट द्वितीय म्हणु. हे आर्यभट्ट ब्रम्हगुप्त नंतर व भास्कराचार्य (भास्कर द्वितीय) यांच्या आधी होऊन गेले.
यांनी महासिध्दांत हा गणित ग्रंथ लिहिला. भास्कराचार्यांनी यांचा उल्लेख केलेला आहे या वरुन हे आर्यभट्ट एक महान गणिती होते व त्यांना समाजमान्यता मिळाली होती हे लक्षात येते, व ब्रम्हगुप्त यांचा कुठल्याही प्रकारे उल्लेख करत नाही म्हणजेच हे आर्यभट्ट द्वितीय हे ब्रम्हगुप्त नंतर होते असा अंदाज बांधता येतो.
यांनी गणिताला एक नविन आणि वापरायला सोपी अशी अक्षरांक पध्दत दिली. अंकांना अक्षरात मांडण्याची कल्पना काही नवीन नव्हती. वेदांमध्ये सुध्दा अनेक संख्या लिहिण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांचा वापर केलेला दिसुन येतो आणि आर्यभट्ट यांनी सुध्दा एक अक्षरांक पध्दत विकसित केली होती. त्यांचा ग्रंथ सोडला तर ती पध्दत कुठेही वापरली गेली नाही हा भाग वेगळा पण आर्यभट्ट द्वितीय यांनी विकसित केलेल्या कटपयादि या पध्दतीला गणित जगतात मानाचे स्थान मिळाले. कटपयादि पध्दतीचा वापर वैदिक गणितामध्ये आजही केला जातो.
कटपयादि पध्दत :-
या पध्दतीमध्ये ० ते ९ या अंकांना बाराखडी च्या क्रमानुसार अक्षरे नेमुन दिलेले आहेत.
१ = क ट प य
२ = ख ठ फ र
३ = ग ड ब ल
४ = घ ढ भ व
५ = ङ ण म श
६ = च त ष
७ = छ थ स
८ = ज द ह
९ = झ ध
० = अ न
या पध्दतीला कटपयादि का म्हणतात हे तुमच्या लक्षात आलेच असेल.
मला आशा आहे की तुम्हाला माझि ही पोस्ट नक्कीच आवडली असेल. तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली? ही पोस्ट आवडली असल्यास किंवा माझ्या पोस्ट मधे जर काही चुकले असेल तर तर कृपया comment नक्की करा.
आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा